महाराष्ट्राची लाडकी सून तेजश्री प्रधान पुन्हा चढणार बोहल्यावर, म्हणाली, 'मला लग्न करायचंय पण...'

Tejashree Pradhan Husband Expectations:  आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक आहे. सध्या एका मुलाखतीतून ती याबद्दल खुलासा केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 14, 2023, 01:37 PM IST
महाराष्ट्राची लाडकी सून तेजश्री प्रधान पुन्हा चढणार बोहल्यावर, म्हणाली, 'मला लग्न करायचंय पण...' title=
tejashree pradhan is going to marry again latest entertainment news

Tejashree Pradhan Marriage News: अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. 'होणार सून मी ह्या घरची', 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकांनतर तेजश्री प्रधान हिची मालिकाविश्वात पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे.  'होणार सून मी ह्या घरची' ही मालिका सुरू असतानाच श्री आणि जान्हवी म्हणजे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी खऱ्या आयुष्यातही लग्न केले होते. 2014 साली त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते. सोबतच त्यांच्या क्यूट लव्हस्टोरीची चांगलीच चर्चा होती. परंतु दुसऱ्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या चाहत्यांना कधीही तुटणार नाही असे त्यांचे नाते वाटतं असतानाच त्यांच्या प्रेमकहाणीचा दी एन्ड झाला. शशांकनं पुन्हा दुसरं लग्न केले. त्याची पत्नी प्रियांका ढवळे ही वकील आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. तेजश्री प्रधान मात्र अद्यापही सिंगल आहे आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करताना दिसते आहे. 

परंतु यावेळी तिनं पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका वृत्तवहिनीच्या मुलाखतीत तिनं याचा खुलासा केला आहे. याचसोबत तिनं आपल्या होणाऱ्या नवऱ्यात कोणते गुण असावेत याचाही खुलासा केला आहे. ती म्हणाली की, ''एखाद्याच्या आयुष्यात चढउतार हे येतातच. त्यावेळी आपण कोलमडून जातो, थांबतो, ब्रेक घेतो. मी शेवटी स्वत:ला समजावलं की नीट राहायचं असेल तर सतत कामं करणं फार गरजेचं आहे. लोकांना असं वाटतंय की मी करिअरकडे जास्त लक्ष देते. अनेक जणांकडून मी माझ्याबाबत अशा पद्धतीची वाक्यंही ऐकली आहेत.'' असं ती म्हणाली. 

त्यापुढे ती म्हणाली की, ''लग्नासाठी मला फार स्थळं येत नाहीत. मला कुटुंब आवडतं. मला कुटुंब हवं आहे. मला लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की, वयाच्या 24-25 व्या वर्षी मी तो निर्णय घेतला. पण, मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचंय. त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे कारण मला बोलायला खूप आवडतं. मी पार्टी करणारी मुलगी नाही, तर मला कुटुंबाबरोबर वेळ व्यतित करायला आवडतो. 

हेही वाचा : किंग खानसोबत हिरोईन म्हणून झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, पण...

सध्या तिची 'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रचंड गाजते आहे. ही मालिका 'स्टार प्लस' वाहिनीवरील 'ये हे मोहोब्बेंते' या मालिकेचा रिमेक आहे. 2013 साली आलेली ही हिंदी मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावरच उचलून घेतले होते. इशिका आणि रमण यांची प्रेमकहाणी प्रचंड गाजली होती. इशिका ही आई होऊ शकत नसते. त्यातून तिचे लग्न रमण ह्याच्याशी होतं. त्या दोघांचेही नशीब यानंतर बदलते कारण रमण याचा घटस्फोट होणार असतो आणि त्याला दोन मुलंही असतात. इशिकाचं लग्न झाल्यानंतर रमणच्या मुलांना ती माया देते. परंतु त्या मुलांना इशिकाला आई म्हणून स्विकारायला बराच वेळ लागतो. मुलांची कस्टडी नक्की रमणच्या पहिल्या बायकोकडे जाणार की रमणकडे राहणार हाही प्रश्न असतो. मुळात ही कथा 'कस्टडी' या मंजू कपूर यांच्या पुस्तकावर आधारित आहे. ही कथा परत सांगण्याचे कारण म्हणजे तेजश्री प्रधानची ही नवी मालिका याच कथेवर जशीच्या तशी आधारित आहे.