शाहीद कपूरची Ex Girlfriend एका मुलाची आई झाल्यानंतर हे सत्य उघड

एका मुलाची आई झाल्यानंतर अभिनेत्रीने शाहिदसोबत असलेल्या अफेयरबद्दल सत्य केलं उघड

Updated: Nov 10, 2021, 12:49 PM IST
शाहीद कपूरची Ex Girlfriend एका मुलाची आई झाल्यानंतर हे सत्य उघड title=

मुंबई : 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'विवाह' चित्रपटात सूरज बडजात्याने साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर प्रकारे चित्रित केला. 10 नोव्हेंबर 2006 रोजी जेव्हा शाहीद कपूर आणि अमृता राव यांचे ऑनस्क्रीन अरेंज्ड मॅरेज निर्मात्याने पडद्यावर सादर केले तेव्हा प्रेक्षकांना वाटले की ते लग्नाच्या चित्रपटाची कॅसेट पाहात आहेत. मुलगी बघायला जाण्याच्या सोहळ्यापासून ते साखपुडा आणि लग्नाच्या विधी चित्रपटात दाखवल्या होत्या. चित्रपटातील अमृता आणि शाहिदची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. 

चित्रपटात काम करत असताना दोघांमधील जवळीकीच्या बातम्यांनीही खूप चर्चेला उधाण आले होते. पण सत्य काय आहे, याचा खुलासा खुद्द अमृताने केला आहे. चित्रपटातील एक गाणं 'तुझको जी भर के मैं देखूं मुझे हक है' या गाण्यात अमृता राव आणि शाहिद कपूरचा रोमान्स पाहून लोक दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीची चर्चा करू लागले. 

साधी, सुंदर, नाजूक अभिनेत्री अमृताचे नाव शाहिदशी जोडले गेले. त्यावेळी शाहिद आणि करीना कपूरच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. असे असतानाही अमृता आणि शाहिदच्या अफेअरच्या  चर्चा रंगत होत्या. पण शाहिद किंवा अमृताने रंगणाऱ्या चर्चांवर कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अनेक वर्षांनंतर अमृताने मौन सोडत त्यांच्या नात्याचा धक्कादायक खुलासा केला.

We weren't even friends': Amrita Rao addresses link-up rumours with Shahid  Kapoor

गेल्या वर्षी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिच्या आणि शाहिदच्या अफेयरच्या चर्चांवर खुलासा केला. अमृताने सांगितले होते की, 'आम्ही दोघे मित्रही नव्हतो, असे असूनही आमचे नाव जोडलं गेलं. शाहिद फक्त माझा चांगला ओळखीचा होता आणि तो सहकलाकार होता. दोघांनाही एकमेकांबद्दल फक्त आदर होता.

अमृता राव पुढे म्हणाली की, 'शाहिद कपूरने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये म्हटले होते की, त्याला माझ्यासोबत काम करायचे आहे. तो खूप गोंडस होता. पण 'विवाह' नंतर शाहीद आणि मला पुन्हा कोणत्याही चित्रपटात जोडी म्हणून कास्ट करण्यात आले नाही.' अमृता राव आणि शाहिद कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात अनुपम खेर, आलोक नाथ, समीर सोनी, सीमा बिस्वास यांसारखे सुप्रसिद्ध कलाकार होते. आजही हा चित्रपट चाहत्यांना फार आवडतो.