Taarak Mehta मधील टप्पूनं घेतला मालिका सोडण्याचा निर्णय?

अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या विषयी स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Updated: Aug 3, 2022, 08:12 PM IST
 Taarak Mehta मधील टप्पूनं घेतला मालिका सोडण्याचा निर्णय? title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान, आता मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडण्याचा निर्णय घेत आहेत. आता मालिकेच्या चाहत्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टप्पूची भूमिका करणारा राज अनादकतनं (Raj Anadkat) मालिकेला रामराम करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.

2017 मध्ये राजनं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सहभाग घेतला होता. त्यानंतर काही वर्षांपासून तो ही मालिका सोडणार याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्याही व्हायरल झाल्या होत्या. त्यावर त्यानं वेगळी कारणं सांगून आपल्याविषयी जे बोललं जात आहे ते खोटं असून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्याचे त्याने सांगितले होते. राजनं नेहमीच ती मालिका सोडण्याविषयी स्पष्ट भूमिका घेतली नाही. आता पुन्हा एकदा तो 'तारक मेहता...' मधून बाहेर पडणार असं बोललं जातं आहे.. टप्पुनं आपण ही मालिका सोडणार की नाही याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राजनं पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखीतीमध्ये म्हटलं आहे की, 'तू लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडली आहे का, त्यावर तो म्हणतो, मी माझ्या चाहत्यांना आणि मला नेहमीच ट्रोल करणाऱ्यांना सांगायचे आहे की, मी नेहमीच उत्सुकता वाढवत असतो. मला ते आवडते. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी जो काही निर्णय घेईल त्याविषयी सांगेल. येत्या दिवसांत जे योग्य ती वेळ साधून मी योग्य तो निर्णय घेईल. त्याची घोषणाही करेन' असे टप्पून म्हटलं आहे.

राजनं भव्य गांधी गेल्यानंतर 2017 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' नावाच्या मालिकेत भूमिका करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून तो ही मालिका सोडणार अशा प्रकारच्या चर्चा व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील त्यानं मालिका सोडण्याविषयी वक्तव्य केलं होतं. 'तारक मेहता...' च्या मालिकेविषयी सांगायचे झाल्यास, जूनपासून 'तारक मेहता...' तील कलाकारांनी ही मालिका सोडली आहे.