दिग्दर्शक अनुष्काला म्हणाला...तू एवढी काही सुंदर नाहीय...म्हणून तुला याशिवाय पर्याय नाही..

अभिनेता शाहरूख खान स्टारर 'रब ने बना जोडी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा.

Updated: May 1, 2021, 04:50 PM IST
दिग्दर्शक अनुष्काला म्हणाला...तू एवढी काही सुंदर नाहीय...म्हणून तुला याशिवाय पर्याय नाही.. title=

मुंबई : अभिनेता शाहरूख खान स्टारर 'रब ने बना जोडी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. अनुष्काने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आज ती प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत अव्वल आहे. अनुष्काला कोणाच्या ओळखीची गरज नाही. पण ही जागा मिळवण्यासाठी तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. सिनेसृष्टीत पाऊल ठेवताना तू सुंदर नाहीस असे बोल देखील ऐकावे लागले. 

दरम्यान दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये अनुष्काने हजेरी लावली. तेव्हा तिने पदार्पणापूर्वी आलेला अनुभव सांगितला. दिग्दर्शक आदित्य चोप्राने अनुष्काला 'रब ने बना जोडी' चित्रपटात काम करण्यापूर्वी एक सल्ला दिला होता. 'तू एवढी काही सुंदर नाहीय...म्हणून तुला अभिनय उत्तम करावाचं लागेल...' 

आदित्य चोप्रा यांचा हा सल्ला ऐकल्यानंतर अनुष्काच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर अनुष्का ठसा-ठसा रडू लागली. ड्राईव्ह करत असताना तिने आई-वडिलांना फोन केला. पण तेव्हा ते मुंबईत नव्हते. आदित्य चोप्रा यांचा हा  सल्ला तिने फार गांभिर्याने घेतला. पण आत अनुष्काच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. 

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती अभिनेता शाहरूख खान स्टारर 'झिरो' चित्ररपटाच्या माध्यमातून चाहचत्यांच्या भेटीस आली होती. पण हा चित्र पट बॉक्स ऑफिसवर हवी तशी कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर अनुष्का शर्मा निर्मित 'पाताल लोक' ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजली.