बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' झळकणार एकत्र

बॉलिवूड मधील करण-अर्जुन म्हणजेच अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरूख खान पुन्हा एकत्र चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. 

Updated: Mar 13, 2019, 12:23 PM IST
बॉलिवूडचे 'करण-अर्जुन' झळकणार एकत्र title=

मुंबई : बॉलिवूड मधील करण-अर्जुन म्हणजेच अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरूख खान पुन्हा एकत्र चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. तब्बल २० वर्षांनंतर सलमान प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साली यांच्या सोबत काम करताना दिसणार आहे. १९९९ साली आलेल्या 'हम दिल दे चूके' सिनेमाचे दिग्दर्शन भन्साली यांनी केले होते. अभिनेत्री एश्वर्या राय आणि सलमान सिनेमात मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यांच्या अभिनयाला चाहत्यांनी विशेष दाद दिली होती.  

सूत्रांच्या सांगण्यानूसार, १९५२ साली आलेल्या 'बाईजू बावरा' सिनेमाचा रिमेक असणार आहे. सिनेमात हरहुन्नरी अभिनेत्री मिना कुमारी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. दिग्दर्शक भन्सालींनी सिनेमासाठी तीन शिर्षक ठरवले असल्याचे सांगण्यात येत आहे. 'बैजनाथ', 'बईजू', 'बईजू तानसेन' यांपैकी एक सिनेमाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू निर्मात्यांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.  

त्याचबरोबर एका प्रेमकथेवर बेतलेल्या सिनेमात सलमान आणि भन्साली एकत्र दिसणार आहे. निर्मात्यांनी सिनेमांच्या नावाची घोषणा केली. 'दिल दे दीया इनशाल्लाह' आणि 'प्यार हो गया इनशाल्लाह' या दोन शिर्षकांपैकी एक शिर्षक अंतीम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सिनेमासाठी अभिनेत्री आलिया भट्ट सोबत चर्चा करण्यात आली आहे. आलिया सध्या तिचा आगामी सिनेमा 'ब्रम्हास्त्र'च्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहे. आलियाने कडून मात्र अजुनही होकार आलेला नाही. आलियाच्या आधी अभिनेत्री प्रियंका चोप्राला सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात आले होते.