मुंबईचा पाऊस बघून अमिताभ म्हणतात...

गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पुन्हा एकदा पावसाचे ते रूप मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 20, 2017, 01:39 PM IST
मुंबईचा पाऊस बघून अमिताभ म्हणतात...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पुन्हा एकदा पावसाचे ते रूप मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. मंगळवारी दुपारी सुरु झालेल्या पावसाचं मुंबईतील एकूण प्रमाण पाहता गेल्या दहा वर्षांत सप्टेंबर महिन्यात कालच्या दिवशी सर्वात जास्त पाऊस पडल्याचंही स्पष्ट झालं. अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.

मुंबईची ही पावसाने केलेली दैना पाहून महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या मनातील भीती ट्विटद्वारे व्यक्त केली. यावेळी त्यांनी चक्क गणरायाचरणी नतमस्तक होतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘सर्व देव पुन्हा रागावले आहेत वाटतं….'