toll rates increase

टोलच्या दरात वाढ, मुंबई प्रवेश करणे महागले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल आंदोलन करत टोल  भरणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर राज्यात टोलफोड आंदोलन झाले. त्यानंतर राज्य सरकारने जवळपास ३० टोल बंद केले. असे असताना आता पुन्हा टोल दरात ५ रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही दरवाढ होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Sep 24, 2014, 11:00 AM IST