govt maharashtra 0

मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास, सरकार जबाबदार - नितेश राणे

 मराठा समाजाच्या मागण्यांसाठी, त्यांच्या भवितव्याबाबतचे प्रश्न आणि समस्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार होतो. ३ ऑगस्टला जेजे हॉस्पीटल ते सीएसटीपर्यंत आयोजित केलेल्या मराठा समाजाच्या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी नाकारली. काही दिवसांपूर्वीच याच भागात अनेक मोर्चे निघाले होते. त्यांच्यासाठी वेगळे कायदे आणि आमच्यासाठी वेगळे कायदे का? मराठ्यांनी फक्त सहनच करत रहायचे का? मराठ्यांचा खरा इतिहास वाचला तर मराठे काय करू शकतात, हे तुम्हाला कळेल. आम्हाला मुघल थांबवू शकले नाहीत तर राज्य सरकारची काय बिशाद. जर मराठ्यांचा उद्रेक झाला तर त्यास संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल, असा गर्भित इशारा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

Aug 1, 2016, 10:00 PM IST

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

Feb 23, 2014, 11:36 PM IST