World Test Championship च्या अंतिम फेरीसाठी Team India अशी पात्र ठरणार, जाणून घ्या संपूर्ण गणित

World Test Championship: ऑस्ट्रेलिया 13 कसोटीत 9 विजय आणि 3 ड्रासह 76.92 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत 13 सामन्यात 7 विजय आणि 4 पराभवासह  55.77 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी 54.55 आहे. श्रीलंका 53.33 विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.

Updated: Dec 23, 2022, 11:40 AM IST
World Test Championship च्या अंतिम फेरीसाठी Team India अशी पात्र ठरणार, जाणून घ्या संपूर्ण गणित title=

World Test Championship Final : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी (Ind vs Ban) मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी बांगलादेशची दाणादाण उडवून दिली. पहिल्याच दिवशी 227 धावांवर संपूर्ण संघ तंबूत पाठवला. भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. या मालिकेत भारताने बांगलादेशला 2-0 ने पराभूत केल्यास वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) मार्ग सुकर होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशला 188 धावांनी पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. दुसरं स्थान पटकावलं असलं तरी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेवर अंतिम फेरीचं गणित अवलंबून असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन सामन्याची कसोटी मालिका असणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया वरचढ ठरलं तर भारताची वर्णी अंतिम फेरीत लागेल. 

वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिप पॉईंट्स टेबल 

  • ऑस्ट्रेलिया (Australia) – 76.92
  • भारत (India)- 55.77
  • साउथ आफ्रिका (South Africa) – 54.55
  • श्रीलंका (Sri Lanka)- 53.33
  • इंग्लंड (England) – 44.44

बातमी वाचा- Ban vs Ind, 2nd Test : अश्विन-उमेशची भेदक गोलंदाजी, बांगलादेशच्या चारी मुंड्या चीत

भारताचं अंतिम फेरीचं गणित कसं असेल पाहूयात

  • अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतानं बांगलादेशला 2-0 ने पराभूत करावं लागेल. या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे या मालिकेत अष्टपैलू रवींद्र जडेजा, गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कर्णधार रोहित शर्मा या स्टार खेळाडूंशिवाय विजय मिळवला आहे.
  • बांगलादेशनंतर भारताला ऑस्ट्रेलियाशी सामना करायचा आहे. WTC 2021-23 भारताची शेवटची कसोटी मालिका आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2023 मध्ये चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताला अंतिम फेरीच्या स्पर्धेत राहण्यासाठी 3-0 किंवा 4-0 ने मात मिळवावी लागेल. 
  • दक्षिण आफ्रिका सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिली कसोटी अवघ्या दोन दिवसांत संपली होती. हा सामना ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून जिंकला. उर्वरित सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यास भारताला फायदा होईल. तसेचं भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास 64.35 इतके गुण होतील.असं झाल्यास WTC फायनलमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.