T20 WC: ज्या खेळाडूला ऑस्ट्रेलियाला नेण्यात Team India संकोच करत होती, त्याच खेळाडूने वाचवली लाज

T20  World Cup 2022 :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला पण अखेर भारताला 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला.  

Updated: Oct 31, 2022, 09:05 AM IST
T20 WC: ज्या खेळाडूला ऑस्ट्रेलियाला नेण्यात Team India संकोच करत होती, त्याच खेळाडूने वाचवली लाज title=

India vs South Africa : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या  टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cp 2022) भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात रंगतदार सामना पार पडला. मात्र अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारत केवळ 133 धावाच करु शकला होता. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्यामुळे ते ग्रुप 2 च्या गुणतालिकेत थेट अव्वलस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. त्याला 15 धावा करता आल्या. मात्र या सामन्यात टीम इंडियातील एका गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले.जाणून घ्या... 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषकाच्या (t20 wprld cup) चालू आवृत्तीत रविवारी पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (Indv v sa )पाच गडी राखून पराभव केला. भारतीय फलंदाजांना 9 विकेटच्या मोबदल्यात 133 धावा करता आल्या. त्यानंतर गोलंदाजांनाही या लक्ष्याचा बचाव करता आला नाही. या पराभवामुळे टीम इंडिया सुपर-12 च्या ग्रुप-2 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. 3 सामन्यांत त्यांचे 4 गुण आहेत तर अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे 5 गुण आहेत.

सूर्याचे अर्धशतक पूर्ण

सूर्यकुमार यादवने 30 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या. सूर्यकुमार  टी 20 विश्वचषकात अर्धशतके झळकावली. लुंगी एनगिडीच्या षटकात 12 धावा काढल्या. 

भारताचा पराभव

पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 133 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने 40 चेंडूत 68 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. विजयी संघाचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने 4 विकेट घेतल्या. त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य दोन चेंडू राखून 5 विकेट्स राखून पूर्ण केले. एडन मार्करामने 52 आणि डेव्हिड मिलरने नाबाद 59 धावा केल्या. मिलरने 46 चेंडूत नाबाद 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन गडी बाद केले.

वाचा : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ, मग पेट्रोल-डिझेल महाग कि स्वस्त झाले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर  

शमी प्रभावित झाला

134 धावांचे लक्ष्य राखण्याचे मोठे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर होते. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन चांगलाच महागात पडला. त्याने 43 धावांत एक विकेट घेतली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दोन विकेट घेतल्या परंतु 6.2 च्या इकॉनॉमी रेटने 25 धावा दिल्या. मोहम्मद शमीने खूप प्रभावित केले. टीम इंडियासमोर 1-1 धावा वाचवण्याचे आव्हान असताना शमीने केवळ 3.2 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 13 धावा देत एक विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारने 3.4 षटकात 21 धावा दिल्या आणि त्यात यश आले नाही. हार्दिक पांड्याने 29 धावांत एक विकेट घेतली.

बुमराहच्या दुखापतीनंतर जागा मिळाली

विशेष म्हणजे शमी पहिल्या T20 विश्वचषकासाठी निवडलेल्या मुख्य संघाचा भाग नव्हता. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. तेव्हा जसप्रीत बुमराहची जागा भरून  काढण्यासाठी शमीला संघात स्थान मिळाले. गेल्या T20 विश्वचषकातही तो भारतीय संघाचा भाग होता. निवड समितीने बुमराहऐवजी मोहम्मद शमीला संघात संधी दिली. अखेर तो ऑस्ट्रेलियाला पोहोचला आणि सराव सामन्यापूर्वी संघात सामील झाला. याशिवाय मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना बॅकअप म्हणून जोडण्यात आले.