कुलदीप, चहलमुळे अश्विन आणि जडेजाला लोक विसरायला लागलीत - सेहवाग

दुसऱ्या वनडेत दमदार कामगिरी करणाऱे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचे भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने कौतुक केलेय. कुलदीप आणि चहलने आपल्या कामगिरीने आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाची उणीव जाणवू दिली नसल्याचे सेहवागने म्हटलंय.

Updated: Sep 24, 2017, 09:28 AM IST
कुलदीप, चहलमुळे अश्विन आणि जडेजाला लोक विसरायला लागलीत - सेहवाग title=

नवी दिल्ली : दुसऱ्या वनडेत दमदार कामगिरी करणाऱे कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचे भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने कौतुक केलेय. कुलदीप आणि चहलने आपल्या कामगिरीने आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाची उणीव जाणवू दिली नसल्याचे सेहवागने म्हटलंय.

युवा क्रिकेटर्स चांगली कामगिरी करत आहेत हे पाहून चांगले वाटते. या दोघांमुळे लोक अश्विन आणि जडेजाला विसरायला लागलीत, असे सेहवाग म्हणाला. टीव्हीवरील एका शोदरम्यान त्याने हे विधान केल आहे.

कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत हॅट्रिक करताना भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.