IPL Corona Rules : तर आयपीएल मध्येच रद्द होणार का? पाहा काय म्हणतो नवा नियम

आयपीएलवर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आहे.

Updated: Apr 18, 2022, 08:42 PM IST
IPL Corona Rules : तर आयपीएल मध्येच रद्द होणार का? पाहा काय म्हणतो नवा नियम title=

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामाच्या चौथ्या आठवड्यात कोविड-19 ची प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कडक क्वारंटाइन नियम आणि बायो बबल असूनही, सोमवारी दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूसह दोन जणांना संसर्ग झाला. संध्याकाळी उशिरा खेळाडूची आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आली.

पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत सांगितले की, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू आणि दिल्लीशी संबंधित सपोर्ट स्टाफमध्ये संसर्गाची लक्षणे दिसून आली, त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली आणि खेळाडूची रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली. यापूर्वी टीम फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनाही संसर्ग झाल्यानंतर वेगळे करण्यात आले होते.

विशेष म्हणजे देशभरात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. हे पाहता आयपीएललाही धोका कायम आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लीग मध्यंतरी पुढे ढकलावी लागली होती. यानंतर सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती. बीसीसीआय आणि आयपीएलने कोरोनाबाबत काय नियम बनवले आहेत ते जाणून घेऊया...

स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी आहे का?

यावेळी स्टेडियमच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एखादा खेळाडू किंवा सदस्य कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्यास त्याला सात दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल. या दरम्यान सहाव्या आणि सातव्या दिवशी त्यांची कोविड चाचणी केली जाईल. संघाच्या बायो-बबलमध्ये समाविष्ट होण्यासाठी, २४ तासांच्या कालावधीत सलग दोन आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये खेळाडूचा रिपोर्ट निगेटिव्ह आली पाहिजे.

अशा परिस्थितीत, 12 सदस्य उपलब्ध असल्यास फ्रेंचायझीला 11 खेळाडूंसोबत जाण्यास सांगितले जाईल. यामध्ये सात भारतीय खेळाडू आणि एक बदली खेळाडू असेल. एखाद्या संघाकडे किमान 12 खेळाडू उपलब्ध नसतील तर BCCI दुसऱ्या दिवशी तो सामना आयोजित करेल. तसे न झाल्यास हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल. तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम असेल.

यावेळी बायो-बबलमधील सर्वात मोठा बदल आणि कठोर क्वारंटाईन नियम बनवण्यात आला आहे. गेल्या वेळी खेळाडू आणि सदस्यांना सात दिवस क्वारंटाईन करावे लागले होते. यावेळी ते कमी करण्यात आले आहे. खेळाडू आणि सदस्यांना फक्त तीन दिवस क्वारंटाईन करावे लागेल. तीन दिवस दर 24 तासांनी सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाईल. हे नियम इतर बायो-बबलमधून येथे आलेल्या खेळाडूंना किंवा सदस्यांना लागू होणार नाहीत. द्विपक्षीय मालिका, फ्रँचायझी शिबिरे, देशांतर्गत स्पर्धा आणि राष्ट्रीय शिबिरांमधून अनेक खेळाडू आणि सदस्य थेट आयपीएल खेळण्यासाठी येत आहेत. त्यांना क्वारंटाईन ठेवण्याची गरज नाही.

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यावेळी महाराष्ट्रातील दोन शहरातील चार मैदानांवर लीग फेऱ्या खेळल्या जात आहेत. मुंबईतील वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरही हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंना विमानतळावर जाण्याची गरज भासणार नाही. ते या स्टेडियम दरम्यान बसने प्रवास करू शकतात.