पाचव्या वनडेत भारताचा ऑस्ट्रेलियावर ७ विकेट राखून विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताने सात विकेट राखून दमदार विजय मिळवलाय. यासोबत पाच सामन्यांची मालिका भारताने ४-१ ने जिंकली.

Updated: Oct 1, 2017, 08:50 PM IST
पाचव्या वनडेत भारताचा ऑस्ट्रेलियावर ७ विकेट राखून विजय title=

नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात भारताने सात विकेट राखून दमदार विजय मिळवलाय. यासोबत पाच सामन्यांची मालिका भारताने ४-१ ने जिंकली.

हिटमॅन रोहित शर्माचे तडाखेबंद शतक आणि सलामीवीर अजिंक्य रहाणेचे अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे २४३ धावांचे आव्हान सात विकेट आणि  ४३ बॉल राखून पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकताना प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर डेविड वॉर्नरने या सामन्यात झळकावले. तर स्टॉयनिसने ४६ आणि हेडने ४२ धावा केल्या. इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाला या सामन्यात ९ गड्यांच्या मोबदल्यात २४२ धावा करता आल्या.