भारत-वेस्ट इंडिज दुसरी टी-20: लखनऊच्या मैदानात रंगणार पहिला सामना

लखनऊमध्य़े पहिला आंतरराष्ट्रीय सामना...

Updated: Nov 6, 2018, 02:10 PM IST
भारत-वेस्ट इंडिज दुसरी टी-20: लखनऊच्या मैदानात रंगणार पहिला सामना title=

लखनऊ : आज भारत आणि वेस्ट इंडिजमध्य़े दुसरा टी20 सामना रंगणार आहे. आजचा सामना जिंकून सिरीज देखील आपल्या नावे करण्याचा प्रयत्न आज भारतीय संघ करणार आहे. लखनऊच्या या मैदानावर आज पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. भारतीय टीम जर आजचा सामना जिंकतो तर वेस्टइंडिज विरुद्ध भारताचा हा तिसरा विजय असेल. याआधी भारताने टेस्ट सीरीज 2-0 आणि वनडे सीरीज 3-1 ने जिंकली आहे. 

विंडीज दुसरा सामना जिकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रविवारी झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 5 विकेटने विजय मिळवला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय टीम ही सिरीज खेळत आहे. भारतीय खेळाडूंकडून या सामन्यात ही चांगली कामगिरीची आशा आहे. यासाठी कार्लोस ब्रॅथवॅट युवा गोलंदाज ओशाने थॉमस, रोवमॅन पावेल यांच्याकडून अधिक आशेने पाहतो आहे. 

भारतीय टीमने पहिल्या सामन्यात विजय मिळवला असला तरी त्यांना फलंदाजी आणखी मजबूत करण्याची गरज आहे. रोहित, शिखर धवन, लोकेश राहुल आणि ऋषभ पंत हे स्वस्तात माघारी परतले. भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करत असले तरी फलंदाजांना त्यांना साथ द्यावी लागेल.