'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'; सुरेश रैनाने अखेर उलगडलं सत्य, 'माझं अख्खं कुटुंब तेव्हा..'

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने कच्छे टोळीने आपल्या काकांचं कुटुंब ठार केल्याचं सांगितलं आहे. तसंच कुटुंबासाठी आपण त्यावेळी आयपीएल खेळलो नसल्याचाही खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2024, 04:39 PM IST
'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'; सुरेश रैनाने अखेर उलगडलं सत्य, 'माझं अख्खं कुटुंब तेव्हा..' title=

IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) 2020 मध्ये आयपीएल खेळला नव्हता. याचं कारण त्याच्या काकांचं कुटुंब ठार कऱण्यात आलं होतं. सुरेश रैनाने 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. आपण क्रिकेटला प्राथमिकता न देता कुटुंबाची निवड केली असंही त्याने सांगितलं आहे. तसंच आपण घरी माघारी परतत असल्याची कल्पना कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिली होती अशी माहितीही त्याने दिली. 

'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'

"माझ्या कुटुंबात शोककळा पसरली होती. माझ्या काकाच्या कुटुंबात मृत्यू झाले होते. कच्छे गुंडांच्या एका गटाने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली होती. पठाणकोटमध्ये हे घडले होते. म्हणून मी तिथे गेलो. पण आयपीएलमध्ये बायो-बबल होता, ज्यामुळे तुम्ही परतू शकत नव्हता. माझं कुटुंब फार तणावात होतं. मी विचार केला की, क्रिकेट ही प्राथमिकता नसून ते नंतरही खेळू शकतो. त्यावेळी कुटुंब महत्त्वाचं होतं," असं सुरेश रैनाने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

चेन्नई संघ युएईत दाखल झाल्यानंतर काही दिवसांत सुरेश रैनाने संघ माघारी परतला होता. आपल्या हॉटेल रुममुळे सुरेश रैना नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. तसंच संघमालक एन श्रीनिवास यांच्या विधानामुळे हे दावे खरे मानले जात होते. पण सुरेश रैनाने आपण धोनीला सगळं सांगितलं होतं असं सांगितलं आहे. 

"होय, मी धोनी आणि संघ व्यवस्थापनाला सगळं सांगितलं होतं. कुटुंब हे नेहमीच प्रथम येतं. मग मी परतलो, आणि 2021 चा हंगाम खेळलो. आम्ही ट्रॉफी जिंकली. पण त्याच्या मागील वर्षी, कुटुंब प्रंचड तणावात होतं. करोनामुळे ते सर्व आधीच नैराश्यात होते आणि नंतर हे घडले. मला वाटलं की मी घरी जावं आणि माझ्या कुटुंबासोबत राहावं,” असं सुरेश रैना म्हणाला.

2020 मध्ये कोविडमुळे आयपीएल स्पर्धा सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली होती. यानंतर ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अत्यंत कडक नियमांचं पालन करत ही स्पर्धा खेळवण्यात आली होती. सर्व संघांना बायो-बबल आणि क्वारंटाइनचं पालन करावं लागत होतं. चेन्नई संघ युएईत दाखल झाल्यानंतर काही दिवसांत सुरेश रैनाने संघ माघारी परतला होता. आपल्या हॉटेल रुममुळे सुरेश रैना नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. 

सुरेश रैना पहिल्या हंगामापासून चेन्नई संघाचा भाग राहिला आहे. चेन्नईच्या यशात त्याचाही वाटा आहे. सुरेश रैना खेळत असताना चेन्नई संघ नऊ वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला होता. यामधील 4 वेळा त्यांनी स्पर्धा जिंकली. रैनाने सीएसकेसाठी 200 सामने खेळले. आजही 200 सामन्यांमध्ये 39.40 च्या सरासरीने 5529 धावा करून तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.