ब्रेटली म्हणाला, 'भारत अजूनही जेतेपदाचा दावेदार, या संघासोबत फायनलमध्ये भिडणार...'

टीम इंडिया फायनलमध्ये धडक देणार का?

Updated: Oct 26, 2021, 03:38 PM IST
ब्रेटली म्हणाला, 'भारत अजूनही जेतेपदाचा दावेदार, या संघासोबत फायनलमध्ये भिडणार...' title=

मुंबई : टीम इंडियाला T20 विश्वचषक 2021 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीला अजूनही विश्वास आहे की विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजेतेपद मिळवेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जावा, अशी आशाही त्याने व्यक्त केली.

एएनआयशी बोलताना ब्रेट ली म्हणाला की, 'पाकिस्तानने भारताविरुद्ध अप्रतिम खेळ केला. भारताला तीन फिरकीपटूंना खेळवता आले असते. तो म्हणाला की, भारत तीन फिरकीपटूंसह जाऊ शकला असता, पण भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद. शमी हा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतीही चूक नव्हती, परंतु पाकिस्तानने उत्तम क्रिकेट खेळले याचे श्रेय तुम्हाला द्यावे लागेल. या सामन्यात भारतासाठी फक्त विराट कोहलीच उभा होता, ज्याने अप्रतिम खेळी खेळली आणि शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर त्याने ज्या प्रकारे षटकार मारला ते आश्चर्यकारक होते.'

तो म्हणाला की, पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाने अजिबात घाबरण्याची गरज नाही. तुम्ही आराम करा. सर्व काही ठीक होईल. भारतीय संघातील खेळाडूंनी त्यांच्या क्षमतेवर आणि त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कदाचित यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळला जाईल.' भारताला पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे.