Solar Eclipse: सूर्यग्रहण संपल्यानंतर आधी हे काम करा, नाही पडणार नकारात्मक प्रभाव

Solar Eclipse 2022 : ग्रहणाबाबत अनेक वेगवेगळ्या मान्यता आहेत. ज्योतिषशास्त्रात काय म्हटलं आहे. वाचा

पोपट पिटेकर | Updated: Oct 25, 2022, 05:36 PM IST
Solar Eclipse: सूर्यग्रहण संपल्यानंतर आधी हे काम करा, नाही पडणार नकारात्मक प्रभाव title=

मुंबई : आज या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan ) होत आहे. आज 2022 सालच्या शेवटच्या सूर्यग्रहण पाहण्यासाठी गावापासून शहरापर्यंत (village to city surya grahan) सर्वत्र लोकांमध्ये उत्सूकता दिसून येत आहे. हे सूर्यग्रहण भारतातील अनेक भागात दिसणार आहे. सूर्यग्रहण ( Surya Grahan 2022) बाबत ज्योतिषांनीही अनेक शंका व्यक्त केल्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाबाबत वेगवेगळ्य मान्यता आहे. काही राशींसाठी ते शुभ तर काहींसाठी अशुभ (Auspicious and inauspicious for the zodiac signs) सिद्ध होऊ शकते. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. आज सूर्यग्रहण दुपारी 2:29 ते 6:32 (सूर्यग्रहण वेळ) पर्यंत असेल. सूर्यग्रहणाच्या काळात अनेक कामे न करण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की सुतक काळात कोणतेही धार्मिक कार्य (religious work) किंवा पूजा सुरु करु नये.

अन्न आणि पाणी न घेणे

सूर्यग्रहण काळात अन्न किंवा पाणी (Solar eclipse food and water) देखील घेऊ नये. असे मानले जाते. असे केल्याने ग्रहणाचा अशुभ प्रभाव (Inauspicious effect of Eclipse) पडतो आणि व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. या सर्वांसोबतच ग्रहणानंतर काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत.

सूर्यग्रहणानंतर हे काम करा

सूर्यग्रहण संपल्यानंतर घराची साफसफाई (House cleaning) करावी, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. ग्रहण संपताच पवित्र नदीत स्नान (Bathing in the river) करावे. हे शक्य नसेल तर हे काम घरबसल्याही पूर्ण करता येईल. या दिवशी दान आणि परोपकाराचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न किंवा पैसे दान (Donate food or money) करा. तसेच गाईला गवत खाऊ (Grass for the cow) घाला.

ग्रहणानंतर मंदिर स्वच्छ करा

सूर्यग्रहण संपल्यानंतर मंदिर पूर्णपणे स्वच्छ (The temple is completely clean)  करून मूर्तींना गंगाजलाने धुवून (Wash the idols with Ganga water) घ्या. सूर्यग्रहणानंतर तुळशी आणि शमीच्या रोपांवर गंगाजल शिंपडून त्यांना शुद्ध करा. या दिवशी मंदिरात झाडू दान (Donate a broom to the temple) केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न (Goddess Lakshmi is pleased) होते आणि भक्तांवर आशीर्वाद कायम राहतो.

सूचना : वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली नाही. झी मीडिया याची पृष्टी करत नाही.