Sankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे 'हे' 4 फायदे

प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. अशाप्रकारे दर तीन वर्षांनी 24 चतुर्थी आणि अधिमास मिळून 26 चतुर्थी होतात. सर्व चतुर्थीचा महिमा आणि महत्त्व वेगळे आहे.  हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक ठिकाणी गणपतीचा हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. संकटी चतुर्थीचे महत्त्व विशेष आहे.

Updated: Jul 5, 2023, 04:20 PM IST
Sankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे 'हे' 4 फायदे title=
sankashti chaturthi 2023

Sankashti Chaturthi 2023 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. अशाप्रकारे दर तीन वर्षांनी 24 चतुर्थी आणि अधिमास मिळून 26 चतुर्थी होतात. सर्व चतुर्थीचा महिमा आणि महत्त्व वेगळे आहे.  हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक ठिकाणी गणपतीचा हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. संकटी चतुर्थीचे महत्त्व विशेष आहे.

चतुर्थी तिथीची दिशा नैऋत्य आहे. अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेनंतर येणार्‍या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, माघी चतुर्थी किंवा तील चौथ असे म्हणतात. बारा महिन्यांच्या क्रमाने ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते. पौष महिन्यातील चतुर्थीला संकट चतुर्थी असेही म्हणतात.  

गणपतीली दुर्वा आवडतात. त्यामुळे गणपतीला दुर्वा अर्पण करताना नेहमी एक मंत्र म्हणावा. तो चांगला असतो. 'श्री गणेशाय नमः दूर्वांकुरान् समर्पयामि।' हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. चतुर्थी म्हणजे खला तिथी. तिथीला 'रिक्त संग्यक' म्हणतात. म्हणूनच यात शुभ कार्य वर्ज्य आहे. जर चतुर्थी गुरुवारी असेल तर मृत्युदंड होतो आणि शनिवारची चतुर्थी सिद्धिदा बनते आणि चतुर्थी 'रिक्त' असण्याचा दोष त्या विशिष्ट परिस्थितीत जवळजवळ नाहीसा होतो. संकष्टी चतुर्थीचे 13 व्रत वर्षभरात पाळले जातात. प्रत्येक व्रतासाठी वेगळी व्रतकथा आहे.

संकष्ट चतुर्थी उपवासाचे 4 फायदे :

- शिवपुत्र गणपती हा चतुर्थीचा देवता आहे. या तिथीला गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि बाधा नष्ट होतात. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा पराभव करणारी चतुर्थी. जो या दिवशी व्रत करतो त्याच्या संकटांचा नाश होतो.
 
 - चतुर्थीचे व्रत केल्याने केवळ संकटातून मुक्ती मिळत नाही तर आर्थिक लाभही होतो. 
 
- संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि शांतता कायम राहते. 
 
- गणेश घरात येणारी सर्व संकटे दूर करतो आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करतो, असे म्हटले जाते.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)