निवडणुकीत हरल्यानंतर मोदींचं भविष्य शून्य!- रमेश

एका परदेशी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर टीकेची तोफ डागली आहे. मोदी हुकुमशाह असल्याचं म्हणत रमेश यांनी मोदींची निवडणुकीनंतर दुर्गती होणार असल्याचं भाकित केलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 7, 2013, 11:08 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
एका परदेशी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर टीकेची तोफ डागली आहे. मोदी हुकुमशाह असल्याचं म्हणत रमेश यांनी मोदींची निवडणुकीनंतर दुर्गती होणार असल्याचं भाकित केलं आहे.
राहुल गांधी निवडणुकीत हारले, तरी त्यांना भविष्य आहे. मोदी यांचं मात्र निवडणुकीनंतर भविष्य अंधारमय असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. काँग्रेस म्हणजे विशाल हत्ती, तर भाजपा लांडगा असल्याचं रमेश यांनी म्हटलं आहे.
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदींना पुढे करून भाजपाने चूक केली असल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदी भाजपचा नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार करत असल्याचं चिदंबरम म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.