कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पोटच्या दोन मुली आणि पत्नीची हत्या करून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण जवळील म्हारळ गावात घडली आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब गायब होत.मात्र घरातून वास येत असल्यामुळे शेजारच्यांनी घर तोडून आत प्रवेश केला असता हे धक्कादायक घटना उघड झाली.

Updated: Feb 1, 2016, 08:40 AM IST
कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू title=

कल्याण : पोटच्या दोन मुली आणि पत्नीची हत्या करून एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण जवळील म्हारळ गावात घडली आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून हे संपूर्ण कुटुंब गायब होत.मात्र घरातून वास येत असल्यामुळे शेजारच्यांनी घर तोडून आत प्रवेश केला असता हे धक्कादायक घटना उघड झाली.

म्हारळ गावातील मोहन टॉवर इमारतीत पंचेचाळीस वर्षीय रणजित यशवंतराव हे आपली पत्नी स्वाती, दोन मुली श्रद्धा आणि आर्या यांच्यासह राहत होते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कामाला असणारे रणजित ५ दिवसांपूर्वी शेजारी आणि नातेवाईक यांना शेगावला जातो असे सांगून गायब झाले. मात्र ४ ते ५ दिवस त्यांचा मोबाईल बंद होता.

इमारती मधील रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तपास केला असता प्रथमदर्शनी रणजित यांनी तिघांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समजतय. मात्र घटनास्थळी सुसाईड नोट किंवा मेसेज आढळलेल्या नसल्याने पोलीस सर्व बाजूंनी तपास करताय.