लवकरच येणार हापूस आंबा बाजारात

पोषक हवामानामुळे यंदा कोकणचा प्रसिध्द हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला लवकर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतून पहिली आंब्याची पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. पहिल्या चार डझनच्या पेटीचा भाव दहा हजार रुपये एवढा आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 30, 2012, 06:37 PM IST

www.24taas.com, रत्नागिरी
पोषक हवामानामुळे यंदा कोकणचा प्रसिध्द हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला लवकर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतून पहिली आंब्याची पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. पहिल्या चार डझनच्या पेटीचा भाव दहा हजार रुपये एवढा आहे.
जगप्रसिध्द असणारा कोकणचा हापूस आंबा लवकरच बाजारपेठेत दाखल होतोय. आंब्याची पहिली पेटी रत्नागिरीहून कोल्हापूरला रवाना झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खराब हवामानाचा फटका अनेक आंबा व्यापा-यांना बसला. ऑगस्टमध्ये फवारणी झाल्यानंतर, ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबल्याने व्यापा-यांना नुकसान सहन करावं लागलं होतं. मात्र सध्या आंबा पिकास पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर फळधारणाही योग्य झाली. रत्नागिरीतून पहिली हापूसची पेटी कोल्हापूरला पाठविण्याचा मान रत्नागिरीच्या वाडकर कुटूंबाला मिळाला आहे..
सध्या आंबा पिकाला पोषक हवामान असलं तरी लवकर येणा-या आंब्याचा भाव मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणार आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखण्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.