ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मैत्री नाही म्हणणारा कोहली आता म्हणतो...

नुकतीच पार पडलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिज खेळाडूंच्या शाब्दिक युद्धांमुळे चांगलीच गाजली. 

Updated: Mar 30, 2017, 06:31 PM IST
ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मैत्री नाही म्हणणारा कोहली आता म्हणतो...  title=

मुंबई : नुकतीच पार पडलेली भारत आणि ऑस्ट्रेलिया सीरिज खेळाडूंच्या शाब्दिक युद्धांमुळे चांगलीच गाजली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी केलेल्या वर्तनामुळे भारताचा कॅप्टन विराट कोहली चांगलाच भडकला होता. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंबरोबर आता मैत्रीपूर्ण संबंध टिकू शकत नाहीत असं कोहली म्हणाला होता. पण या वक्तव्यावर कोहलीनं प्रतिक्रिया दिली आहे. 

मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. सगळ्या ऑस्ट्रेलियन टीममधल्या खेळाडूंबाबत मी वक्तव्य केलेलं नाही तर फक्त दोन खेळाडूंना उद्देशून मी बोललो होतो, असं कोहली म्हणाला आहे. तसंच ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना मी ओळखतो तर काही जणांबरोबर मी आरसीबीकडून खेळतो. त्यांच्याबरोबर मैत्री कायम राहील, असं ट्विट कोहलीनं केलं आहे.