टीम इंडियाविषयी माजी क्रिकेटरचं परखड भाष्य

वर्ल्डकप क्रिकेटचं बिगूल लवकरच वाजेल, घोडामैदान जवळ असतांना माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी टीम इंडिया थकल्यासारखी वाटतेय, आणि टीम चॅम्पियन टीमसारखी वाटत नसल्याचं म्हटलं आहे.

Updated: Feb 9, 2015, 10:15 AM IST
टीम इंडियाविषयी माजी क्रिकेटरचं परखड भाष्य title=

मुंबई : वर्ल्डकप क्रिकेटचं बिगूल लवकरच वाजेल, घोडामैदान जवळ असतांना माजी क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी टीम इंडिया थकल्यासारखी वाटतेय, आणि टीम चॅम्पियन टीमसारखी वाटत नसल्याचं म्हटलं आहे.

मोहिंदर अमरनाथ यांनी पत्रकारांना सांगितलं, "एका सामन्यानं सर्व काही बदलू शकतं, पण मला काही शंका आहेत, टीम इंडियाची चॅम्पियन चमक दिसत नाही, चॅम्पियन टीम वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारखी असते, तुम्ही काही सामने जिंकतात आणि काही हरतात, पण तुम्ही सकारात्मक राहून खेळलं पाहिजे. ही टीम थकल्यासारखी वाटतेय, या टीममध्ये ती चमक दिसत नाही, जी दिसणे अपेक्षित आहे".

यावर आणखी पुढे बोलतांना मोहिंदर अमरनाथ म्हणाले, "असंही असू शकतं की त्यांना दौरे आणि प्रवास करून थकवा आला असेल, मध्ये थोडा ब्रेक घेतला तर फायदा होतो. टीममध्ये काही बदल देखिल करणे आवश्यक होतं".

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.