लोढा समितीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला

सुप्रीम कोर्टानं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा दिला आहे.

Updated: Oct 17, 2016, 05:56 PM IST
लोढा समितीचा निर्णय सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टानं बीसीसीआयच्या विनंतीला स्वीकारुन लोढा समितीबाबतचा अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. बीसीसीआयनं शिफारशी लागू करण्यासाठी आणखी अवधी मागिलाय आहे. तसंच लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची तारीख बीसीसीआयकडे मागितली आहे.

दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी कोर्टात प्रतिज्ञा पत्र सादर केलं. तसंच बीसीसीआयमध्ये कॅगच्या प्रतिनिधींची नियुक्ती म्हणजे सराकारी हस्तक्षेप असं शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदी असतांना व्य़क्त केल्याचं ठाकूर यांनी सांगितलं आहे.