मोहालीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. 

Updated: Mar 26, 2016, 09:09 PM IST
मोहालीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार ? title=

मोहाली: टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी एकमेकांना भिडणार आहेत. 

या दोन्ही संघाच्या एकमेकांविरुद्धच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारतच ऑस्ट्रेलियासमोर वरचढ ठरला आहे. नुकत्याच झालेल्या सीरिजमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला 3-0नं व्हाईट वॉश केलं होतं. 

आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध 12 टी 20 मॅच खेळले आहेत. यापैकी 8 मॅच भारतानं तर 4 मॅच ऑस्ट्रेलियानं जिंकल्या आहेत. तर भारतामध्ये झालेल्या 2 पैकी दोन्ही मॅच जिंकण्यात भारताला यश आलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या 6 मॅचपैकी 4 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे आणि 2 मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

टी 20 वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि भारत 4 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यापैकी 2 मॅचमध्ये भारताचा तर 2 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला आहे. 

2007 आणि 2014 मध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं, तर 2010 आणि 2012 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.