भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी मोहालीची खेळपट्टी बदलली

टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी आज भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मोहालीतील खेळपट्टी बदलण्यात आलीये. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून खेळपट्टी बदलण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर खेळपट्टी बदलण्यात आलीये. बीसीसीआयनेही याला दुजोरा दिलाय. 

Updated: Mar 27, 2016, 08:21 AM IST
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी मोहालीची खेळपट्टी बदलली title=

मोहाली : टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी आज भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी मोहालीतील खेळपट्टी बदलण्यात आलीये. भारतीय टीम मॅनेजमेंटकडून खेळपट्टी बदलण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर खेळपट्टी बदलण्यात आलीये. बीसीसीआयनेही याला दुजोरा दिलाय. 

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाकडून खेळपट्टी बदलण्याची मागणी केली होती. ही मागणी मॅनेजमेंटकडून स्वीकारण्यात आली असून त्याप्रमाणे खेळपट्टी बदलण्यात आल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. 

विशेष म्हणजे, वर्ल्डकपसारख्या स्पर्धांमध्ये आयसीसीचे क्युरेटर खेळपट्टी तयार करतात. यादरम्यान भारतीय संघाने खेळपट्टी का बदलण्यास सांगितली यावरही सवाल उपस्थित होऊ शकतात.