पराभवानंतर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमध्ये बदल

टीम इंडियाच्या संचालकपदी रवी शास्त्री, तर माजी कसोटीवीर संजय बांगर आणि भारत अरूण यांना टीम इंडियाच्या सह प्रशिक्षकपदी नेमण्यात आलं आहे. टीम इंडियाचा इंग्लंड दौऱ्यात दारूण पराभव झाला, या पराभवानंतर हा बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Updated: Aug 19, 2014, 01:31 PM IST
पराभवानंतर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमध्ये बदल title=

मुंबई : टीम इंडियाच्या संचालकपदी रवी शास्त्री, तर माजी कसोटीवीर संजय बांगर आणि भारत अरूण यांना टीम इंडियाच्या सह प्रशिक्षकपदी नेमण्यात आलं आहे. टीम इंडियाचा इंग्लंड दौऱ्यात दारूण पराभव झाला, या पराभवानंतर हा बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नव्या बदलानुसार आर. श्रीधर हे भारतीय संघाचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. डंकन फ्लेचर हे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम राहतील, पण गोलंदाजी प्रशिक्षक ज्यो डॉस आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांना इंग्लंड दौऱ्यातल्या वन डे सामन्यांच्या जबाबदारीतून विश्रांती देण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.