'शिवसेनेच्या शिवजलक्रांतीमुळे गावात पाणी'

मान्सूनपूर्व पावसानं मराठवाड्यातली जनता आनंदली असली, तरी त्यावरून सत्ताधारी युतीमध्ये मात्र चढाओढ सुरू झालीय. आधी दुष्काळ उपाय योजनांवरून सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता शिव जलक्रांतीच्या कामांमुळेच हे पाणी दिसत असल्याचं म्हटलंय. 

Updated: Jun 14, 2016, 04:12 PM IST
'शिवसेनेच्या शिवजलक्रांतीमुळे गावात पाणी' title=

मुंबई : मान्सूनपूर्व पावसानं मराठवाड्यातली जनता आनंदली असली, तरी त्यावरून सत्ताधारी युतीमध्ये मात्र चढाओढ सुरू झालीय. आधी दुष्काळ उपाय योजनांवरून सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता शिव जलक्रांतीच्या कामांमुळेच हे पाणी दिसत असल्याचं म्हटलंय. 

दुष्काळी भागातून मला फ़ोटो ,फोन आले. आमच्या गावाचा संपर्क गावांशी तुटलाय एवढा पाऊस झालाय. आनंद आहे एवढे वर्ष आम्ही पाणीच पाहिलं नव्हतं. शिवसेनेच्या शिवजलक्रांतीमुळे आमच्या गावात पाणी आलंय. अस उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.