कुलाब्यात कारने दोन मुलांना चिरडले

कुलाब्यामधील नेवीनगरमध्ये झालेल्या कार अपघातात दोन सख्या भावांना आपला जीव गमवावा लागला. 

Updated: Dec 13, 2016, 11:25 PM IST
कुलाब्यात कारने दोन मुलांना चिरडले  title=

मुंबई : कुलाब्यामधील नेवीनगरमध्ये झालेल्या कार अपघातात दोन सख्या भावांना आपला जीव गमवावा लागला. 

आर्मीतील एक जवान आपल्या पत्नीला गाडी शिकवत असताना हा अपघात घडला. आर्मीतील एका जवानाची दोन मुलं सायकलवरून जात होती. त्यावेळेस गाडी शिकत असलेल्या महिलेचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यांनी या दोन मुलांना चिरडले.

 यातील एका मुलाचं वय सात तर दुस-याचं बारा वर्ष आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जवान आणि त्याच्या पत्नीला अटक केलीय. अपघात झालेली गाडीही ताब्यात घेतलीय. या अपघातामुळे नेवीनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.