'...तर निरुपम स्वत:च्या पायावर परत जाणार नाहीत'

संजय निरुपण यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसेला मात्र झिणझिण्या आल्यात. 'दादरमध्ये येऊन जर त्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना हात जरी लावला तर ते परत जाताना स्वत:च्या पायाने चालत जाऊ शकणार नाहीत. बोलणं आणि करणं यात फरक असतो. कार्यकर्त्यांच्या बळावर हे करावं लागतं, काँग्रेसकडं नेते अधिक आहेत, परंतु कार्यकर्त्यांची वाणवा असल्यामुळं त्यांनी अशी भाषा वापरू नये' असं प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी दिलंय

Updated: Jul 15, 2015, 04:53 PM IST
'...तर निरुपम स्वत:च्या पायावर परत जाणार नाहीत' title=

मुंबई : संजय निरुपण यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसेला मात्र झिणझिण्या आल्यात. 'दादरमध्ये येऊन जर त्यांनी बीएमसी अधिकाऱ्यांना हात जरी लावला तर ते परत जाताना स्वत:च्या पायाने चालत जाऊ शकणार नाहीत. बोलणं आणि करणं यात फरक असतो. कार्यकर्त्यांच्या बळावर हे करावं लागतं, काँग्रेसकडं नेते अधिक आहेत, परंतु कार्यकर्त्यांची वाणवा असल्यामुळं त्यांनी अशी भाषा वापरू नये' असं प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी दिलंय

फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना चोप देऊ असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी काल दिला होता. त्याविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतलीय.

'निरुपम यांच्यात हिम्मत असेल तर दादरमध्ये येऊन फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवून दाखवा' असं खुलं आव्हान मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी दिलं. 'निरुपमांची दादागिरी खपवून घ्यायला हा काही यूपी, बिहार नाही' असा टोलाही देशपांडेंनी हाणलाय. 

यालाच प्रत्युत्तर देत 'संदीप देशपांडे यांचं आव्हान स्विकारलंय... दादरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई झाली तर तिथंही जाईन' असं प्रत्युत्तर संजय निरुपम यांनी दिलं होतं.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.