बोलणी शिवाय काँग्रेस आघाडीची संपली बैठक

दोन्ही काँग्रेस आघाडीबाबतमधील जागा वाटपांचा घोळ संपविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या  वर्षा बंगल्यावर सुरु असलेली बैठक चर्चेशिवाय संपली. मात्र, आघाडीची बोलणी पुन्हा सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Updated: Sep 23, 2014, 11:40 AM IST
बोलणी शिवाय काँग्रेस आघाडीची  संपली बैठक  title=

मुंबई : दोन्ही काँग्रेस आघाडीबाबतमधील जागा वाटपांचा घोळ संपविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या  वर्षा बंगल्यावर सुरु असलेली बैठक चर्चेशिवाय संपली. मात्र, आघाडीची बोलणी पुन्हा सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीकडे असलेल्या ११४ जागांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. तसंच आज सकाळी राष्ट्रावादी काँग्रेस सोबत बैठक घेऊन आघाडीबाबत महत्त्वाची भूमिका घेणार असल्याचंही सांगितलं होतं. मात्र, आज घेण्यात आलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत निष्पण काहीही निघाले नाही. त्यामुळे पुन्हा सायंकाळी बैठक घेण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 144 चा आग्रह सोडण्यास तयार असेल तर काँग्रेसही 130 पर्यंत जागा सोडण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जागावाटपावरून आघाडीतही आनंदी आनंद नाही.  काँग्रेसचा 124 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीनं फेटाळला असून राष्ट्रवादीकडील 114 जागांबात काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.