मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही बंडाळी कायम

राजीनामा मागे घेत पक्षात परतल्यानंतरही काँग्रेस नेते गुरुदास कामत यांची नाराजी कायम आहे. 

Updated: Jun 24, 2016, 08:27 PM IST
मुंबई काँग्रेसमध्ये अजूनही बंडाळी कायम title=

मुंबई : राजीनामा मागे घेत पक्षात परतल्यानंतरही काँग्रेस नेते गुरुदास कामत यांची नाराजी कायम आहे. निरुपम यांचा शिवसेनेतला रंग उतरला नाही अशा शेलक्या शब्दांत गुरुदास कामत यांनी हल्लाबोल केला आहे. 

निरुपम आणि मोहन प्रकाश यांच्याबद्दल विचार करायला वेळ नसल्याचं कामत म्हणाले आहे. नव्या उमेदीच्या नेत्यांना ताबडतोब झेप घेण्याची सवय असते असंही कामतांनी म्हटलं आहे. जिथे माझी गरज नाही, तिथे वेळ देण्याचा निरर्थक प्रयत्न करत नसल्याचं कामतांनी स्पष्ट केलं आहे.