दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला

दिघ्यात 'झी 24 तास'च्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आलीय. झी 24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप भारती यांना मारहाण करण्यात आलीय.

Updated: Feb 28, 2017, 03:16 PM IST
दिघ्यात वार्तांकन करणाऱ्या 'झी 24 तास'च्या प्रतिनिधीवर हल्ला  title=

दिघा : दिघ्यात 'झी 24 तास'च्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आलीय. झी 24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप भारती यांना मारहाण करण्यात आलीय.

दिघ्यातल्या अनधिकृत इमारतींवर कारवाईदरम्यान ही मारहाण करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप यांना प्रचंड मारहाण केली. 

या मारहाणीत व्हिडीओ जर्नलिस्ट संदीप गंभीर जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

कारवाई सुरू होती, त्यावेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित नव्हते का? पोलीस होते, तर त्यांनी हस्तक्षेप का केला नाही? एवढी गंभीर मारहाण होईपर्यंत पोलीस बघत बसले का? राज्यात कायद्याचं राज्य आहे की गुंडांचं? असे सगळे सवाल यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.