शिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत, आता आदित्य ठाकरेंचीही सरकारवर टीका

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईत मोर्चा काढला गेला.

Updated: Oct 15, 2016, 07:21 PM IST
शिक्षणक्षेत्रात अपेक्षीत बदल नाहीत, आता आदित्य ठाकरेंचीही सरकारवर टीका title=

मुंबई : युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईत मोर्चा काढला गेला. शिक्षण क्षेत्रातल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केजी टू पीजी नावाने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना, आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

सरकार सुशासन नव्हे तर आश्वासनपुरतं मर्यादित रहातं की काय अशी भीती आदित्य यांनी व्यक्त केली. भाजप सरकारच्या गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात शिक्षण विभागात अपेक्षेप्रमाणे बदल झाले नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.