मुंबईत लोकलमध्ये दोन दिवसात 20 लोकांचा मृत्यू

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मागील दोन दिवसांच्या घटनांमध्ये 20 लोकांना आपला जीव गमवावा गाला आहे.

Updated: Nov 20, 2014, 05:17 PM IST
मुंबईत लोकलमध्ये दोन दिवसात 20 लोकांचा मृत्यू title=

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मागील दोन दिवसांच्या घटनांमध्ये 20 लोकांना आपला जीव गमवावा गाला आहे.

लोकलच्या प्रवासात सुरूवातीला 18 तारखेला 13 जणांना, तर 19 तारखेला 7 जणांना जीव गमवावा लागला, यापैकी 9 मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.

मध्य रेल्वेच्या लोकल प्रवासात 13 जणांचा मृत्यू झालाय. यात कल्याणमध्ये 3, वसईत 1, वडाळ्यात 1 आणि पालघरमध्ये 2 जणांचा समावेश आहे. यात काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.

यात रेल्वे लोकल गाड्यांमध्ये होत असलेली गर्दी कारणीभूत आहे, त्यात उशीरा धावणाऱ्या गाड्यांमुळे ऑफिस गाठण्याची काही अनेकांच्या जीवावर बेतली आहे.

लटकून प्रवास करणे, वीजेच्या खांब्याला धडकणे यात सर्वात जास्त जणांचा जीव गेला असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.