साताऱ्यात डॉल्बीच्या आवाजानं भिंत कोसळली, ३ ठार

गणेश विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीच्या जोरदार आवाजामुळं भिंत कोसळून ३ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली आहे. 

Updated: Sep 9, 2014, 11:12 AM IST
साताऱ्यात डॉल्बीच्या आवाजानं भिंत कोसळली, ३ ठार title=

सातारा: गणेश विसर्जन मिरवणुकीतील डॉल्बीच्या जोरदार आवाजामुळं भिंत कोसळून ३ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली आहे. 

जिल्ह्यातील राजपथ भागात डॉल्बीच्या आवाजानं भिंत कोसळली आणि त्याखाली दबून तीन नागरिकांना जीव गमवावा लागला तर दोघं जखमी झाले आहेत. या घटनेमुळं शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला गोलबोट लागलंय. 

शहरातील राजपथावरील एलआयसीच्या इमारती शेजारी असलेल्या एका जुन्या इमारतीला लागूनच वडापावची गाडी लावण्यात आली होती. काही गणेशभक्त वडापाव खाण्यात मग्न असतानाच डॉल्बीच्या दणदणाटामुळं इमारतीची भिंत कोसळली आणि नागरिक त्याखाली अडकले. 

तिथल्या उपस्थितांनी लगेच धाव घेत दबलेल्या नागरिकांना बाहेर काढले मात्र त्यात तिघांचा मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.