रत्नागिरीत दळवींच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांचे राजीनामे

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेमधल्या बंडखोरीला अखेर वाचा फुटलीय.

Updated: Feb 3, 2017, 08:29 AM IST
रत्नागिरीत दळवींच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांचे राजीनामे  title=

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेमधल्या बंडखोरीला अखेर वाचा फुटलीय.

दापोली आणि मंडणगड तालुका प्रमुख आणि उपविभाग प्रमुखासह कार्यकारिणीनं राजीनामे दिलेत. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या समर्थनार्थ सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केलेत.

केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि कॅबिनेट मंत्री रामदास कदम यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाडणाऱ्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तिकिटं मिळाल्याचा दावा दळवी यांनी केलाय. 

दापोली, खेड, मंडणगड या तीन तालुक्यात दळवींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे दळवींची ही नाराजी शमवण्यात पक्षाला यश आलं नाही. याचा फटका निश्चितच शिवसेनेला बसू शकतो.

येत्या दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचं सूर्यकांत दळवींनी सांगितलंय.