चंद्रपुरातून विरोधकांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात

शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधकांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात झालीय. चंद्रपुरातून ही यात्रा सुरू होतेय. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते नागपूरहून चंद्रपूरला रवाना झाले.

Updated: Mar 29, 2017, 11:52 AM IST
चंद्रपुरातून विरोधकांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात title=

चंद्रपूर : शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधकांच्या संघर्ष यात्रेला सुरुवात झालीय. चंद्रपुरातून ही यात्रा सुरू होतेय. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते नागपूरहून चंद्रपूरला रवाना झाले.

शेतक-यांना कर्जमाफी, शेतीमालाला योग्य दर, वाढलेली महागाई या प्रश्नांवर हि संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसह शेकाप, रिपब्लिकन पक्ष कवाडे गट, समाजवादी पक्ष, एमआयएम आणि युनायटेड जनता दल या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून सुरू होणारी ही यात्रा यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, पुणे मार्गे 3 एप्रिलला मुंबईत पोहचणार आहे.