गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर टोळक्याचा हल्ला

रत्नागिरीतल्या वेतोशी गावातील घनगरवाड्यावर एक अजब प्रकार घडला. गावातील झोरे कुटुंबिय गाढ झोपेत असतानाच त्यांच्यावर वेतोशी गावातील नागरिकांनीच हल्ला केल्याचा आरोप झोरे कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. 

Updated: Jan 18, 2015, 12:37 PM IST
गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर टोळक्याचा हल्ला title=

रत्नागिरी: रत्नागिरीतल्या वेतोशी गावातील घनगरवाड्यावर एक अजब प्रकार घडला. गावातील झोरे कुटुंबिय गाढ झोपेत असतानाच त्यांच्यावर वेतोशी गावातील नागरिकांनीच हल्ला केल्याचा आरोप झोरे कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. 

रात्री दहा ते बाराच्या सुमारास दीडशे ते दोनशे जणांच्या टोळक्यांनी अचानक झोरे कुटुबियांवर हल्ला केला. तसंच घराबाहेरून मोठ्या प्रमाणात दगडफेकही करण्यात आली. घराबाहेर ठेवण्यात आलेल्या दुचाकी जाळण्याचा प्रयत्न या टोळक्यांनी केला. तसंच घरातील सामानाची नासधुस केली.

मोठ्या प्रमाणात झालेल्या दगडफेकीमुळं दगडांचा खचच्या खच घरात फहायला मिळत होता. गोठ्यात बांधलेल्या म्हशींनाही काही प्रमाणात या दगडफेकीमुळं इजा झालीय. हा हल्ला गावातील लोकांनी केल्याचा आरोप झोरे कुटुंबियांनी केलाय. 

या संदर्भात रत्नागिरीच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पहाटेपर्यंत गुन्हा नोंदवून घेण्यात आलाय. पूर्व वैमानस्यातून हा हल्ला झाला असल्याचं बोललं जातंय. मात्र इतक्या अमानुषपणे हल्ला झाल्यामुळं झोरे कुटुंबिय भितीच्या सावटाखाली गावात राहतंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.