धक्कादायक: नगरमध्ये बालसुधारगृहातून सहा मुलं पळाली

 नगरच्या बालसुधारगृहातून सहा मुलांनी सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याचं नाक-तोंड दाबून पळ काढला आहे. कर्मचाऱ्याच्या हातातील चाव्या हिसकावल्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजा उघडला आणि भिंतीवरून उड्या मारून पसार झाले.

Updated: May 31, 2015, 11:22 AM IST
धक्कादायक: नगरमध्ये बालसुधारगृहातून सहा मुलं पळाली title=

अहमदनगर :  नगरच्या बालसुधारगृहातून सहा मुलांनी सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याचं नाक-तोंड दाबून पळ काढला आहे. कर्मचाऱ्याच्या हातातील चाव्या हिसकावल्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजा उघडला आणि भिंतीवरून उड्या मारून पसार झाले.

शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. सुधारगृहात असलेल्या मुलांनी तिथल्या बेरड दाजी असं नाव असलेल्या कर्मचाऱ्याला पाणी मागितलं. बेरड हे पाणी देण्यासाठी मुलांची खोली उघडून आत गेले. त्यातील एका मुलानं त्यांचं नाक, तोंड दाबलं. अन्य पाच मुलांनी त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांच्या हातातील चाव्या मुलांनी हिसकावून सुधारगृहातून पळ काढला.  

या सर्व मुलांच्या शोध सुरू आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.