अहमदनगरमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा आगीत होरपळून मृत्यू

नवविवाहित दाम्पत्याचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलीय. 

Updated: Feb 11, 2017, 03:21 PM IST
अहमदनगरमध्ये नवविवाहित दाम्पत्याचा आगीत होरपळून मृत्यू title=

अहमदनगर : नवविवाहित दाम्पत्याचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलीय. 

काजल आणि प्रशांत वाघमारे असं या मयत दाम्पत्याचं नाव आहे. अवघ्या 5 दिवसांपूर्वी म्हणजे 5 फेब्रुवारीलाच त्यांचा विवाह झाला होता. 

काजलनं स्वतःला पेटवून घेतल्यानंतर, प्रशांतनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. 

या मृत्यूप्रकरणातलं गूढ मात्र अजूनही कायम आहे. याप्रकरणी लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधिक तपास करतायत.