रत्नागिरीत ४ हजार किलो गुळ जप्त

येथे उत्पादन शुल्क विभागाने ४ हजार किलो गुळ जप्त केला. हा गूळ विना परवना नेला जात होता.

Updated: Jun 3, 2016, 09:48 AM IST
रत्नागिरीत ४ हजार किलो गुळ जप्त title=

रत्नागिरी : येथे उत्पादन शुल्क विभागाने ४ हजार किलो गुळ जप्त केला. हा गूळ विना परवना नेला जात होता.

या कारवाईत गुळ वाहतूक करणारा ट्रक, दारु तयार करणारे रसायन आणि गुळ असा जवळपास ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जप्त केलेल्या गुळाची बाजारातील किंमत १ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-मुर्शी इथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.