हिंजवडीत ३ दिवसांपासून ३ महिला बेपत्ता

हिंजवडीत ३  दिवसांपासून एकाच वेळेस ३ महिला बेपत्ता आहेत, मात्र यांचा कोणताही तपास लागत नसल्याने या महिलांचं अपहरण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Updated: Dec 1, 2014, 06:43 PM IST
हिंजवडीत ३ दिवसांपासून ३ महिला बेपत्ता title=

पिंपरी-चिंचवड : हिंजवडीत ३  दिवसांपासून एकाच वेळेस ३ महिला बेपत्ता आहेत, मात्र यांचा कोणताही तपास लागत नसल्याने या महिलांचं अपहरण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

या बेपत्ता महिलांपैकी एका महिलेला पोटात दुखत असल्याने, डॉक्टरांकडे जाऊन येतो असं सांगून या तीनही महिला निघाल्या आहेत, मात्र अजून तीनही महिला परतलेल्या नाहीत.
या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात घबराट पसरली आहे.

प्रतिभा प्रकाश हजारे, मंगला सिद्धार्थ इंगळे , विद्या दशरथ खाडे अशी बेपत्ता झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी प्रतिभा हजारे यांचे पती प्रकाश बाबू हजारे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

गेल्या शुक्रवारी दुपारी ओझरकरवाडीमधून या तिन्ही महिला गायब झाल्यात. मात्र तीन दिवस होऊनही या महिलांचा काहीही ठावठिकाणा समजला नसून त्यांचे अपहरण झाले असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.