सलमान-संजयमध्ये दुरावा कुणामुळे ?

एक वेळ अशी होती जेव्हा सलमान खान आणि संजय दत्त हे एकमेकांचे जवळचे मित्र होते.

Updated: Mar 6, 2016, 09:48 PM IST
सलमान-संजयमध्ये दुरावा कुणामुळे ? title=

मुंबई: एक वेळ अशी होती जेव्हा सलमान खान आणि संजय दत्त हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. पण संजय दत्त जेलमधून बाहेर आल्यानंतर मात्र या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. 

जेलमधून सुटलेल्या संजय दत्तला भेटायला सलमान गेला नाही. क्रेशा बजाजच्या लग्नालाही हे दोघं गेले होते, पण इथेही सलमाननं संजयची भेट घेतली नाही. या दोघांमध्ये रणबीर कपूरमुळे दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. 

संजय दत्तच्या आयुष्यावर एक चित्रपट येत आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर करतोय, आणि संजय दत्तनंही रणबीरच्या भूमिकेवर आक्षेप घेतले नाहीत, त्यामुळे सलमान नाराज झाल्याचा चर्चा आहेत. 

कतरिना आणि रणबीर यांच्यातल्या अफेअरमुळे आधीच सलमान रणबीला पसंत करत नाही, त्यातच आता कतरिना-रणबीरचं ब्रेक अप झाल्यामुळे सलमान रणबीरवर नाराज आहे. त्यामुळे संजय दत्त आणि सलमानमध्ये सगळं काही आलबेल नाहीये. 

जेलमधून बाहेर आलेल्या संजय दत्तला सलमान पार्टी देईल, ही पार्टी सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर होईल असंही बोललं जातं होतं. पण संजय दत्तनं स्वत:च या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं. 

एवढच नाही तर या पार्टीबाबत मी बरेच दिवसांपासून ऐकतोय, पण पार्टी तर दूरची गोष्ट आहे, बाहेर आल्यावर मला भेटायला अजूनही सलमान आलेला नाही, असं संजय दत्त म्हणाला आहे.