'असहिष्णुते'वर भाष्य करणाऱ्या आमिर-शाहरुखला जोरदार झटका

मुंबई पोलिसांनी अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान यांची सुरक्षा घटवण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Jan 8, 2016, 11:32 AM IST
'असहिष्णुते'वर भाष्य करणाऱ्या आमिर-शाहरुखला जोरदार झटका title=

नवी दिल्ली : मुंबई पोलिसांनी अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान यांची सुरक्षा घटवण्याचा निर्णय घेतलाय. 

केवळ, आमिर आणि शाहरुखच नाही तर जवळपास २५ बॉलिवूड हस्तींच्या सुरक्षेत घट करण्यात आलीय. परंतु, 'असहिष्णुते'वर भाष्य करणाऱ्या आमिर आणि शाहरुखचंही नाव या यादीत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. 'असहिष्णुते'च्या वादानंतर या दोघांनाही अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु, आता मात्र त्यांना धोका नसल्याचं पोलिसांना वाटतंय. 

उल्लेखनीय म्हणजे, खिलाडी अक्षय कुमार, दिग्दर्शक प्रोड्युसर महेश भट्ट यांच्यासहीत १५ जणांच्या सुरक्षेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

उल्लेखनीय म्हणजे, नुकतंच 'अतुल्य भारत' अभियानातूनही आमिरला डच्चू दिल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे, आता या जाहिरातींतही 'अतिथी देवो भव:' म्हणणारा आमिर दिसणार नाहीय. त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर त्याचा करार पुढे न वाढवता अमिताभ बच्चन यांची या अभियानासाठी आता निवड झाल्याचं सांगण्यात येतंय.