'बाहुबली' नंतर 'महाभारत' बनवणार दिग्दर्शक राजामौली

बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली बाहुबलीनंतर आता महाभारताच्या कथेवर सिनेमा करणार आहेत. 'बाहुबली २' सिनेमाचं शूटिंग संपण्यापूर्वीच एसएस राजामौली हे महाभारताच्या कथेवर काम करण्यास सुरुवात करणार आहेत. 'एसएस राजामौली यांच्या महाभारतात अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. अजून सिनेमामध्ये कोण कलाकार असणार आहेत याबाबत निर्णय झालेला नाही.

Updated: Mar 30, 2017, 10:06 PM IST
'बाहुबली' नंतर 'महाभारत' बनवणार दिग्दर्शक राजामौली title=

मुंबई : बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली बाहुबलीनंतर आता महाभारताच्या कथेवर सिनेमा करणार आहेत. 'बाहुबली २' सिनेमाचं शूटिंग संपण्यापूर्वीच एसएस राजामौली हे महाभारताच्या कथेवर काम करण्यास सुरुवात करणार आहेत. 'एसएस राजामौली यांच्या महाभारतात अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. अजून सिनेमामध्ये कोण कलाकार असणार आहेत याबाबत निर्णय झालेला नाही.

आमिर खान, रजनीकांत देखील या सिनेमामध्ये झळकतील अशी देखील चर्चा आहे. अमिताभ या सिनेमात भीष्म पितामहच्या भूमिकेत दिसतील. अमिताभ यांनी २०१२ मध्ये अॅनीमेशन सिनेमा 'महाभारत' देखील भीष्म पितामह यांची भूमिका साकारली होती.