पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन , पाकिस्तानचे ४ रेंजर्स ठार

पाकिस्ताननं सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू केलंय. काल पाकिस्तानी रेंजर्सनी BSFच्या छावणीवर गोळीबार केला. यात एक जवान शहीद झाला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ४ रेंजर्स ठार झालेत. 

Updated: Jan 1, 2015, 11:27 AM IST
पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन , पाकिस्तानचे ४ रेंजर्स ठार title=

नवी दिल्ली : पाकिस्ताननं सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू केलंय. काल पाकिस्तानी रेंजर्सनी BSFच्या छावणीवर गोळीबार केला. यात एक जवान शहीद झाला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे ४ रेंजर्स ठार झालेत. 

जम्मू आणि काश्मीरमधल्या सांबा जिल्ह्यात ही घटना घडलीये. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी नाक मुठीत धरून पांढरं निशाण फडकवलं असलं तरी चोराच्या उट्या बोंबा सुरूच आहेत. रात्री उशिरा पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय उच्चायुक्तांना बोलावून ४ रेंजर्स मारले गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

मात्र यातून शस्त्रसंधीचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड इशाराच पाकिस्तानला दिला गेल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री मनोरह पर्रिकर यांनी कठोर शब्दात इशारा दिला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.