भारतीय लष्कराकडून 7 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान

सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे.

Updated: Oct 21, 2016, 07:38 PM IST
भारतीय लष्कराकडून 7 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान title=

कठुआ : सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे. सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या 7 पाकिस्तानी रेंजर्स आणि एका दहशतवाद्याचा भारतीय लष्करानं खातमा केला आहे. पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे. 

पाकिस्तानकडून सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी पाकिस्तानी रेंजर्सकडून जम्मूच्या हिरानगर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.