साध्वींच्या विधानावर अखेर पंतप्रधान बोलले, संसद चालू देण्याची विनंती

साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सलग तिसऱ्या दिवशीही राज्यसभेत गदारोळ सुरु असल्यानं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलं आहे. आम्ही अशा वादग्रस्त विधानांचा निषेधच करतो, मात्र साध्वींनी माफी मागितली असून विरोधकांनाही त्यांना माफ करुन राष्ट्रहितासाठी संसदेचं कामकाज चालू द्यावं, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 

Updated: Dec 4, 2014, 01:09 PM IST
साध्वींच्या विधानावर अखेर पंतप्रधान बोलले, संसद चालू देण्याची विनंती title=

नवी दिल्ली: साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सलग तिसऱ्या दिवशीही राज्यसभेत गदारोळ सुरु असल्यानं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलं आहे. आम्ही अशा वादग्रस्त विधानांचा निषेधच करतो, मात्र साध्वींनी माफी मागितली असून विरोधकांनाही त्यांना माफ करुन राष्ट्रहितासाठी संसदेचं कामकाज चालू द्यावं, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 

साध्वी निरंजन ज्योती यांच्या विधानावरुन विरोधक आक्रमक झाले असून साध्वी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत. गुरुवारी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधकांनी साध्वींच्या राजीनाम्याची मागणी केली. 

अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं. मोदी म्हणाले, साध्वी निरंजन ज्योती नवीन आहेत, त्यांची पार्श्वभूमीही सर्वांना माहित आहे. त्यांचं विधान निषेधार्ह असून असं विधान करणं टाळायला पाहिजे. राज्यसभेत अनेक ज्येष्ठ नेते असून त्यांनी साध्वींना माफ करुन संसदेचं कामकाज चालू द्यावं, असं मोदींनी सांगितलं. 

मोदींनी उत्तरावरही विरोधकांचं समाधान झालं नाही आणि राज्यसभेचं कामकाज पुन्हा तहकूब करावं लागलं. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून सभागृहात सुरु असलेला गोंधळ योग्य नाही अशा शब्दात राज्यसभा अध्यक्षांनी सर्व खासदारांना सुनावलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.