हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देणार : राजनाथ सिंग

 कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली.

PTI | Updated: Jan 2, 2016, 01:37 PM IST
हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देणार : राजनाथ सिंग title=

नवी दिल्ली :  कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली.

ते शनिवारी भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. भारताला पाकिस्तानशी शांतता आणि सौहार्दाचे संबंध हवे असले तरी, पाकिस्ताना आमचा शेजारी देश आहे. आम्हाला पाकिस्तानच नव्हे तर शेजारच्या सर्व देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आम्हाला शांतताही हवी आहे. मात्र, भारतावर कोणताही दहशतवादी हल्ले झाल्यास आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असे राजनाथ सिंग म्हणालेत.

जवानांनी पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. देशाला लष्करातील जवानांचा अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.